झारखंड : गालालाइट कंपनीच्या वतीने झारखंड येथे दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी ‘बी दी लाइट’ अभियान राबवण्यात येत आहे. गेले दहा महिने सुरू असलेल्या अभियानात ठिकठिकाणी नेत्रतपासणी शिबिराचे, तसेच अंध व्यक्तींसाठी कार्यशाळा, कलाकौशल्य प्रशिक्षण आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे.
गालालाइट कंपनीचे संचालक युसुफ गालाभाईवाला म्हणाले, ‘भारतात अंध, दृष्टीदोष असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. वेळीच उपचार केल्यास अनेक लोकांची दृष्टी वाचू शकते. यासाठी आम्ही ‘बी दि लाइट’ अभियान सुरू केले असून, यात आतापर्यंत दहा हजार लोकांची प्राथमिक तपासणी करून, चार हजार सातशे लोकांची अधिक तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले. यामध्ये ७८८ लोकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.’